कविता - 🌷 " सिकंदर - पौरस " तारिख - १२ डिसेंबर २०१६
कविता - 🌷 " सिकंदर - पौरस " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १२ डिसेंबर २०१६ कधी शत्रूही जाऊ शकतो भारावून, उच्च- तम जीवन- मूल्यांना पाहून ... रणयुद्ध थांबवून, अभय-दान देऊन जन्म-भराच्या मैत्रीचं वरदान देऊन ... जग-ज्जेता व्हायचं एकमेव स्वप्नं ... उराशी आला होता तो कवटाळून ... सिकंदर सुसाट घुसला हिंदुस्तानात, लढला संपूर्ण तयारी-निशी जोशात ... पौरस व अंभी हे शेजारच्या राज्यांचे राजे ... पण दोघांच्यामधून विस्तव सुद्धा जात नसे ... एक दक्षिण-धृव दुसरा उत्तर-धृव असे होते ते... पौरसचं सरळ मन, अंभी भ्याड-मतलबी-धूर्त पौरस सुसंस्कृत,अंभी संधी-साधून सोडी मुहूर्त ... हिंदुस्तानात घुसण्या आधी, खूप पूर्वी-पासून हुशार, महत्वाकांक्षी सिकंदरने गृह-पाठ करुन दोघांचेही स्वभाव-विशेष ठेवले होते तपासून ... आपसातल्या त्या दुष्मनीचा फायदा उचलून ... एकाचवेळी दोघांच्याकडे शांती प्रस्ताव पाठवला ... घाबरट, लालची अंभी त्याच्या जाळ्यात फसला ... त्यामुळं युद्ध-शांती-करार सिकंदर-अंभीत झाला शूर-वीर पौरसने प्रस्ताव साफ शब्दात फेटाळला ... सिकंदर-पौरसचा जेव्हा झाला आमना-सामना, सिकंदर मनी म्हणाला,"ये ...