कविता - 🌷 " न लढताच सर केला जीवन-गड " तारिख - २ सप्टेंबर २०१६
कविता - 🌷 " न लढताच सर केला जीवन-गड "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २ सप्टेंबर २०१६
माता करीते सूक्ष्मतम संस्कार गर्भावर ...
घटिका-पळे-दिस-मास जाती भराभर ...
जीव जन्मतो नऊ मास पूर्ण झाल्यावर ...
अभिमन्युपरि लेवून संस्कारांची झालर ...
माता मग करीतसे नव-संस्कार त्या नवजीवावर ...
वात्सल्याचे बोल करिती संस्कार त्या अर्भकावर...
हळूहळू सुसंस्कार घडत जाती सतत त्या बाळावर...
रात्रंदिवस सूक्ष्मातिसूक्ष्म पैलू पडत जाती हिऱ्यावर ...
माता दररोज सांगे गोष्टी महान्-सद्गुणी-व्यक्तींच्या...
कान टवकारुन श्रवण करीतसे बाळ, तन्मयतेने त्या ...
आपसूक संस्कार होई तेव्हा विविध प्रकारच्या गुणांचा...
गोष्टी संत-महंतांच्या, गोष्टी कर्तृत्वाच्या-अध्यात्माच्या...
गोष्टी राजा-महाराज्यांच्या, देशभक्तीच्या-रामायणाच्या...
गोष्टी महाभारताच्या निष्ठेच्या-चातुर्याच्या अन् विरतेच्या...
जिजाऊंनी जन्म देऊन, कणाकणांनी घडवलं शिवबाला...
ऐकून गोष्टी-धैर्याच्या-शौर्याच्या-धाडसाच्या अंतर्मुख झाला...
अन्यायाच्या, अन्याय-कर्त्यांच्या विरुद्ध पुरता पेटून उठला...
मनोमनी तेव्हाच, गो-ब्राह्मण-प्रतिपालकाचा निश्चय झाला...
ऐकून पराक्रमाच्या गौरवगाथा, घडवू शकला स्वजीवन-गाथा...
जमवून लहानथोर मावळ्यांचा जथ्था, रचली देशाची वीरगाथा...
तोडच नाही जिजाऊंच्या अविरत-अपार कष्टांना-व परिश्रमांना...
अन् गुरु समर्थ रामदासांच्या अर्थपूर्ण मार्गदर्शक आशिर्वचनांना...
दोहोंच्या मार्गदर्शनानं सिंहासनारूढ-शिवबा, शिव-छत्रपति झाला...
अवघ्या भरत-भूच्या जनमानसी कायम-स्वरुपी विराजमान झाला...
न भूतो न भविष्यती असा, अमर इतिहास रचला गेला...
"न-लढताच जिजाबाईंनी, जीवनाचा-गड " सर केला...
आजची ही कविता लिहीत-असताना,
ऊर अभिमानाने-देशप्रेमाने भरुन आला ...
कोटी-कोटी प्रणाम त्या थोर माऊलीला ...
कोटी-कोटी मुजरा त्या शूरवीर शिवबाला...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉
Comments
Post a Comment