कविता - 🌷 "वाल्मिकी-रामायण,माणसांतर्गत" तारिख - रविवार २२ जानेवारी २०१७
कविता - 🌷 "वाल्मिकी-रामायण,माणसांतर्गत" कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - रविवार २२ जानेवारी २०१७ नुसतं राम- राम म्हटल्याने पापांचे डोंगर नष्ट होतात ... पाप केलं मनानं, शरीरानं, हातांनी वा विचारांनी ... कसंही केलं तरी ते जमा होतंच जातं, अंतर्यामी ... वाल्या-कोळ्यानी केली पापं, पोटा-पाण्यासाठी ... माणूस करतो, कुटुंबासाठी-प्रेमापोटी-मजेसाठी ... पापांची वारूळंच्या-वारूळं उभी करतो, अंतरी ... जेव्हा-केव्हा त्याचे अंत:चक्षू उघडतात, उपरती होते आणि तीच असते सुरवात ... सर्व-प्रथम तर कोणी " राम राम" म्हणायला, मनं-बुद्धी अन् जीभही नसते तयार वळायला ... अर्थात " वाम-मार्ग " सोडणं, सोपं नसतंच ... अट्टाहासाने जरी "मरा-मरा" असं विपरीतच, "राम-नाम" घेऊन, वाल्याप्रमाणे नाम-जपलं ... तेच सन्मार्गावरचं पहिलं पाऊल, होऊ शकतं ... मग हळूहळू सुरु होतं, पापांच्या राशींचं वितळंणं, तळमळ पारखून विधाता करतो पुढील मार्ग-दर्शन ... अंतर्स्थित गुरु करतो "प्रत्येक-वाल्याचं" रूपांतरण ... जन्म होतो, एका प्रगल्भ-बुद्धीच्या वाल्मिकी-ऋषींचा ... पूर्ण रूपांतरीत...