कविता - 🌷 "वाल्मिकी-रामायण,माणसांतर्गत" तारिख - रविवार २२ जानेवारी २०१७

कविता - 🌷 "वाल्मिकी-रामायण,माणसांतर्गत"
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख -  रविवार २२ जानेवारी २०१७

नुसतं राम- राम म्हटल्याने पापांचे डोंगर नष्ट होतात ...

पाप केलं मनानं, शरीरानं, हातांनी वा विचारांनी ...
कसंही केलं तरी ते जमा होतंच जातं, अंतर्यामी ...
वाल्या-कोळ्यानी केली पापं, पोटा-पाण्यासाठी ...
माणूस करतो, कुटुंबासाठी-प्रेमापोटी-मजेसाठी ...
पापांची वारूळंच्या-वारूळं उभी करतो, अंतरी ...

जेव्हा-केव्हा त्याचे अंत:चक्षू उघडतात,
उपरती होते आणि तीच असते सुरवात ...

सर्व-प्रथम तर कोणी " राम राम" म्हणायला,
मनं-बुद्धी अन् जीभही नसते तयार वळायला ...

अर्थात " वाम-मार्ग " सोडणं, सोपं नसतंच ...
अट्टाहासाने जरी "मरा-मरा" असं विपरीतच,
"राम-नाम" घेऊन, वाल्याप्रमाणे नाम-जपलं ...
तेच सन्मार्गावरचं पहिलं पाऊल, होऊ शकतं ...

मग हळूहळू सुरु होतं, पापांच्या राशींचं वितळंणं,
तळमळ पारखून विधाता करतो पुढील मार्ग-दर्शन ...
अंतर्स्थित गुरु करतो "प्रत्येक-वाल्याचं" रूपांतरण ...

जन्म होतो, एका प्रगल्भ-बुद्धीच्या वाल्मिकी-ऋषींचा ...
पूर्ण रूपांतरीत होऊन तारण्यास-अन्य मनुष्य-योनीला ...
"रामायण" या सारखी एकमेव-द्वितीय-वाङ्‌मय-रचना,
निर्माण करुन उपकृत करतो तो संपूर्ण मानवी जगाला ...

जोवर पृथ्वीतलावर माणूस-जात आहे अस्तित्वात,
तोवर महर्षी वाल्मिकी आणि त्यांचा रामायण-ग्रंथ ...
यांचं माणसाला विस्मरण होणं, केवळ अशक्य-प्राय ...

कारण ती-कथा, सदा-सर्वदा, वारंवार घडंतच राहणार ...
संदर्भ, नावं, पात्रं, स्थळं, भूमिका खचितच बदलणार ...
काळाच्या-कसोटीवर भक्कमपणे ती चिरंतन टिकणार ...

मूळ-कथानक, विस्तार आणि अंत, हे त्रिकालाबाधित ...
असं एक सत्य आहे, ज्यास मृत्यूही नाही शिवू शकत ...
ज्याचा प्रचंड प्रयत्न करुनही, विसर नाही पडू शकंत ...
जोपर्यंत आहेत चंद्र-सूर्य-तारका झळकत, आभाळात
तोवर"वाल्मिकी-रामायण"राहणार जिवंत, मना-मनात ...
कायम-स्वरूपात, चिरकाल, प्रत्येक माणसा- माणसात ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🌅🕉🌷🙏















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "